Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



कोरोनावर प्रभावी प्राणायाम? - भाग १०

लेखनप्रकार : 
आयुष्याच्या रेशीमवाटा
वाङ्मयशेती: 
आयुष्याच्या रेशीमवाटा
"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १०
कोरोनावर प्रभावी प्राणायाम?
 
वैद्यकशास्त्र कुठलेही असो, अद्ययावत-आधुनिक असो किंवा परंपरागत चालत आलेले पण पुढे अविकसित राहिलेले वैद्यकशास्त्र असो; हृदयाच्या गतीला वैद्यकीयशास्त्रात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. दर मिनिटाला हृदयाची किती ठोके पडतात यावरून माणसाच्या आजाराचे निदान करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही वैद्यकीयशास्त्रात कायमच आहे आणि भविष्यातही कायमच राहणार आहे कारण हृदयाची गती जितकी नीट असेल तितकेच आरोग्य सुदृढ असते.
 
हृदयगती बिघडल्यानंतर आरोग्य बिघडते कि आरोग्य बिघडल्यानंतर हृदयगती बिघडते, या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे व्यक्तिसापेक्ष असू शकते पण आरोग्याचा संबंध हृदयगतीशी आहे, हे मात्र शाश्वत असल्याचे स्वीकारायलाच हवे पण सहसा असे होत नाही. मनुष्य कोणताही असो तुरळक प्रसंग सोडले तर डोक्याने विचार करतच नाही. कधी हृदयाने तर कधी खिशाने विचार करतो. सारासार विचार करण्याऐवजी कोणतीही एकच बाजू निवडून त्याच बाजूचे पराकोटीचे समर्थन करत राहणे क्षम्य समजता येईल पण आपलीच बाजू सर्वश्रेष्ठ ठरवण्याच्या नादात अन्य बाजू चुकीच्या आहेत असा जेव्हा समज दृढ होतो त्याच बिदूवर मनुष्य आपला विवेक आणि तारतम्य गमावून बसतो. अशा स्थितीत मनाची केवळ काही कवाडे उघडी राहून उरलेली अन्य कवाडे बंद होत जाऊन ज्ञानग्रहणाच्या रेशीमवाटा अवरुद्ध होऊन जातात.
 
योग आणि प्राणायाम हे अतिप्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे. या विषयातील मी तज्ज्ञ नसल्याने कोरोनासारख्या विषाणूच्या संसर्गावर प्राणायामाचा कितपत प्रभाव पडेल, हे अधिकारवाणीने सांगू शकत नसलो तरी एक अभ्यास अथवा चिंतन म्हणून यासंबंधातील माझे विचार व अनुभव प्रस्तुत करत आहे. मी दहावर्षापासून प्राणायाम करत असलो तरी नियमित करत नाही. वर्षातून ३६५ दिवसांपैकी अंदाजे ६०-६५ दिवस करत असतो. प्राणायामाला मी वेगवेगळ्या कसोट्यांवर १० वर्षांपासून पारखत आलेलो आहे. श्वसनासंबंधित व्याधी असेल तर प्राणायाम रामबाण इलाज आहे, असा मला प्रदीर्घ अनुभव आला आहे.
 
मला वर्षातून ३ वेळा सर्दी-पडसा-खोकला होतो. अगदी बालपणासूनच नियमितपणे होतो. त्याचे वेळापत्रकही ठरले आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो तेव्हा, पावसाळा संपून हिवाळा सुरु होतो तेव्हा आणि हिवाळा संपून उन्हाळा सुरु होतो तेव्हा. पण या वेळापत्रकात मजेशीर बाब अशी आहे कि मला आधी सर्दी होते व नंतर ४-६ दिवसांनी ऋतुबदल होतो. म्हणजे असे कि मला जेव्हा सर्दी होते तेव्हा उन्हाळा सुरु असतो. वातावरणात काहीही बदल झालेला नसतो. पण नंतर ४-६ दिवसांनी वातावरण बदलने सुरु होते, आकाशात ढग जमायला लागतात, पाऊस पडायला लागतो व तापमान कमी व्हायला लागते. बरं ही सर्दी इंग्रजी कॅलेंडर किंवा मराठी नक्षत्रानुसार होत नाही. ऋतूचे आगमन मागे पुढे झाले तर माझी सर्दी सुद्धा त्यानुसार मागे पुढे होत असते. अनुमान असाही काढता येईल कि माझ्या सर्दीवरून संभाव्य वातावरण बदलाच्या तारखा ठरवता येतात. हे ज्याअर्थी मी जाहीरपणे मांडतो आहे त्याअर्थी; कुणी मला आव्हान देऊन सिद्ध करून दाखव म्हटले तर माझी तयारी आहे, हे उघड आहे. मी प्राणायाम करायला लागलो आणि माझी सर्दी-पडसा-खोकला गायब झाला. अजिबात होतच नाही. पण प्राणायाम थांबवले कि सुरु होतो हा मागील अनेक वर्षाचा अनुभव आहे.
 
कोरोना संसर्ग झाल्यास श्वास घेताना त्रास होतो. प्राणायाम करताना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे जाणवल्यास कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षण मानता येईल. कोरोनाचे प्राथमिक निदान म्हणून प्राणायाम उपयोगी पडू शकतात. किंवा प्राणायाम केल्यामुळे हृदयाची गती व श्वसनसंस्थाच इतकी मजबुतीने कोरोनाचा प्रतिकार करेल कि, संसर्ग होणारच नाही. शक्यता का नाकारावी?
 
तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे
 
पण यातही गंमत अशी आहे कि, योग-प्राणायामाचा अभ्यास आणि संशोधन केवळ साधूसंत करतात. यावर अधिक व्यापकपणे संशोधन होण्याची गरज आहे परंतु सामान्य जनतेच्या आयुष्याच्या रेशीमवाटांवर जागोजागी टोलनाके तयार करणे हेच बुद्धिवंत व विचारवंतांचे जीवितकार्य असल्याने योग-प्राणायाम विकून गडगंज संपत्ती मिळवता येत नसेल तर बहुराष्ट्रीय कंपन्यासहित कोणत्याच देशी-विदेशी संशोधकांना हे नको असते .... नकोच असते!
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १० - दि. २८ मार्च, २०२० - "कोरोनावर प्रभावी प्राणायाम?"

 

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
 

Share