![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हक्क (ग्रामीण कथा)
आंबऋषी गावातला जुना माणूस. चौर्याऐंशी वय. त्याच्याबरोबरची पिढी केव्हाच गारद झाली होती. तो वयाची साठ-पासष्ट असतानाच त्याचे एकेक समवयस्क दिवंगत झाले होते. या वयातही तरुणाला लाजवेल असा त्याच्यात उत्साह होता. वयोमानानुसार फक्त डोक्यावरचे केस पिकले होते. दात आणखीन कणखर होते. काठीचा आधार न घेतो चालत-फिरत होता.
पहाटे पाचला उठून तो नित्यनियमाने शेतात जात असे. डाळिंबांच्या झाडांना पाणी देत असे. मोटर चालू करून फक्त ठिबक चालू करणे व झाडाच्या मुळाशी आलेला केरकचरा व पालापाचोळा काढण्याचे काम आंबऋषी करत असे. डाळिंबाची पिकलेली पाने तो एक एक करून तोडून काढत असे. एखादे रोगीस्ट डाळिंब काढून टाकत असे.
आंबऋषी कौटुंबिक बाबतीतही समाधानी होता. बायकोही गेल्या पाच वर्षांपूर्वी दम्याच्या आजाराने गेली होती. तीन मुले होती. त्यांपैकी थोरला देवाघरी गेला होता. त्याला दोन मुले. त्यांनाही मुले झाली होती. उर्वरित दोन मुलांनाही नातवंडे आली होती. नातवंडांचाही संसार चांगलाच फुलला होता. नातवंडाची मुले म्हणजे ‘काळे तोंड’ पाहण्याचे भाग्य आंबऋषीला लाभले होते. गावातल्या चार पिढ्या विकसीत झालेल्या पाहणारा आंबऋषी हा एकमेव भाग्यवान होता.
मुलांच्या वाटणीत आंबऋषीला रस्त्यालगतचे शेत खाण्यासाठी दिले होते. ज्यावेळी त्याला शेत दिले त्यावेळी शेताशेजारून रस्ता गेलेला नव्हता. गावाशेजारूनच महामार्ग गेल्यामुळे गावातल्या रस्त्याकडेच्या शेताला सोन्याचा भाव आला होता. इतर शेतीपेक्षा दहा ते वीस पटीने भाव असल्याने प्रत्येकाने आपल्या रस्त्याकडेच्या जि’नी बिल्डर्सना विकल्या होत्या. जिल्ह्याचे ठिकाण गावापासून अवघ्या दहा-बारा किलो’ीटर होते. त्यामुळे शहरानेही हद्दवाढ करत करत अनेक गावे गिळंकृत केली होती.
आंबऋषीलाही अनेक बिल्डरनी येऊन शेतीची मागणी केली होती पण शेती वडिलोपार्जित असल्याने आपल्या वडिलांची आठवण म्हणून अंाबऋषीने शेती विकली नव्हती. कित्येक वेळा मुलेही जमीन विकण्यासाठी तगादा लावत होती. आंबऋषीने त्यांचेही ऐकले नव्हते. तो सरळ म्हणायचा,
“हे बगा पोरानू! माझ्या हयातीत मी जमीन ईकनार नाही. माझा अंत्यविधी या शेतात झाला पायजे. मी जिता हाय तवर तर हे शेत विकता येणार नाही. माझ्या बापानं हे शेत मोठ्या कष्टानं घेतलंया. शेतं इकून आपल्या गावात आपूनच परकं व्हायचं कारं बाबानो?”
पोरं म्हणायची,
“भावं! आपली जि’नीला आता सोन्याचा भाव येतोया. आपल्या शेजा-पाजार्याची शेतं लाखाच्या भावात गेली. आपल्याला साडेतीन कोट रुपये येत्यातं. आपली सगळीच कामं व्हत्याती. आमा दोगास्नी एक एक कोटी दी. थोपल्याच्या पोरास्नी एक कोटी दी. तू अर्धा कोटी घी. पैसं बँकीत ठीव अन् याज खात बसकी. न्हायतर आता शेतीत राह्यलंयच काय?”
“शेतीत काय मंजी? या काळ्या आयच्या जिवावरच माझा संसार फुलला. तुमचं संसार उभारलं हे इसरू नका. आपल्या शेतीला सोन्याचा भाव हाय हे खरं हाय. एकदा जमीन इकून पैसं आलं की पैशाला पाय फुटत असत्यातं. बगितलं न्हाय? आपल्या शेजार्यांनी काय केलं? शेतं इकली. कुणी जीपा घेतल्या. कुणी टरका घेतल्या. कुणी पोरा पुरीच्या लग्नानी उडवलं. तर काय जणांनी चैन करून पैसं नासवलं. आता मला सांगा-कुणाकडं किती पैसं राह्यल्यातं? आपलंबी तसंच व्हणार. म्या जीवंत असूस्तवरच श्यात इकू देणार न्हाय.”
दर पाच-दहा वर्षांंनी पोरं शेती विकण्यासाठी वडिलांना गळ घालायची, पण आंबऋषी मात्र शेती विकण्यास तयार नसायचा. त्याचं व शेताचं आंतरिक नातं होतं. शेत त्याचा जीव की प्राण होते.
आणखी दोन वर्षाचा कालावधी गेला. त्याचे शेत पाच कोटी रुपयाला मागू लागले. पोरंही जास्त गळ घालू लागली. गावातील इतर लोकही त्याला समजावून सांगू लागले,
“अरे आंबऋषी भाऊ! तुझा हट्टीपणा सोड. पोरं म्हंत्याती तर इकून टाक बाबा. भावबी चांगला हाय. चार पैसं येत्यालं ते त्यांच्या कुटुंबाला उपयोगी पडत्यालं. उगं हाटवादीपणा करू नगंस. पोरांच्या म्हागनं जा बाबा. म्हातारपण कुत्तरपण असतंया. ” गावातला एखादा वयस्कर.
“आरं पर आल्यालं पैसं पोरं ठिवत्याली का? पैशाला पाय फुटत्यालं. वर्सा- दोन वर्सात चुराडा करत्याली.” अंाबऋषी आपले मत व्यक्त करायचा.
“आरं ती का लहान हायती? प्रत्येकाला नातवंडं परतुंडं आल्याती. तेंला कळतंय की पैसा कसा वापरायचा. तू का उगं सोन्याच्या हंड्यावर साप बसल्यावानी बसलायच त्यांचा काळ हून?” वयस्कर.
आंबऋषीचा नाविलाज होऊ लागला. सर्वांच्या दबावाने ‘हो’ ‘ना’ करत शेवटी तो शेती विकण्यास तयार झाला. त्याचा होकार कळताच दुसर्याच दिवशी शेतात बिल्डर्सच्या चार-पाच गाड्या दाखल झाल्या. अक्षरश: लिलाव पद्धतीने शेतीची विक‘ी झाली. पाच कोटीचे साडेपाच कोटी आले. दुसर्याच दिवशी आंबऋषीला ए.सी. कारने खरेदीखतासाठी शहरात नेण्यात आले. एका दिवसात सगळे पैसे ताब्यात घेऊन शेतीची खरेदी झालीसुद्धा. नंतर घरात काही मनपरिवर्तन नको, म्हणून बिल्डर्सनी घाई केली होती.
जमीन विकून एकच दिवस गेला. बिल्डर्सच्या गाड्या शेताभोवती घिरट्या घालू लागल्या. त्यांनी डाळिंबाचं उभं पीक एका रात्रीत भुईसपाट केलं. शेतातली झाडं तोडली होती. आंबऋषीचं खोपाट पाडलं. बुलडोझर फिरवून जमीन सपाट केली. काम रात्रंदिवस दिवा लावून चालू होते. तेथे प्लॉट्स पाडण्यात आले. दिवसभर कस्टमर येत होते.
निसर्गरम्य वातावरण, शहरापासून जवळ, पाण्याची मुबलक सोय, हाकेच्या अंतरावर शाळा व हॉस्पिटल, पाया कमी अंतरावर, बँक-लोन व हप्त्याची सोय, बुकींगवर सोन्याचे नाणे भेट अशी जाहिरात केल्यामुळे आठवड्याच्या आतच प्लॉट्स संपले. आतली बातमी समजली. साडेपाच कोटीला घेतलेल्या जि’नीवर थोडासा खर्च करून डेव्हलपरने साठ कोटींचा धंदा केला होता. जमिनीच्या दहापट किंमत त्याने आठवड्यात काढली होती.
पोरांना ज्यांना त्यांना पैसे वाटून आंबऋषीच्या नावे एक कोट बँकेत टाकले होते.
आंबऋषी हताशपणे सकाळच्या वेळी आपल्या शेताभोवती फेरी मारून यायचा. त्याला पूर्वीच्या डाळिंबाच्या शेताची आठवण यायची. त्याची झोपडी शेतात होती. दुपारच्या वेळी तो त्या झोपडीत आराम करायचा. आता त्या ठिकाणी बांधकामे चालू झाली होती. शहरवासीय माणसे आपल्या बायका मुलांसोबत ‘आपलं घर’ पाहायला येत होती. आंबऋषी मात्र एका कोपर्यात उभा राहून हे दृश्य भरल्या डोळ्याने पाहत असे. कारण भावनेला व्यवहाराने जिंकले होते. त्याच्या काळजाचा तुकडा असलेले शेत बिल्डरच्या घशात गेले होते.
कधी कधी आंबऋषी प्लॉटमध्ये आपल्या झोपडीच्या जागी जाऊ पाहायचा. सतत आंबऋषी प्लॉटवर येत असल्याचे पाहून एके दिवशी तेथील वॉच’नने हटकले,
“अरे चाचाजी, क्या करते हो उधर? हररोज देखता हूँ। बाहर जाव भला। अभी बिल्डरसाब आणेवाले है।”
“अरे भाई, मैं इस खेतका मालिक हूँ।” आंबऋषी मोडक्या-तोडक्या हिंदीत म्हणाला.
“पहेले रहेंगे, फिलहाल अभी तो हमारे बिल्डरसाब मालीक है। चार दिनसे देख रहा हूँ। आप बिना बताए हमारे हद्दमे घूस रहे हो। हमारे कस्टमर क्या सोचेंगे? जगहमें कुछ लफडा है क्या? हमारे बिल्डरसाबने तो आपको यहाँ फिरनेको मना कर दिया है। आपको पेमेंट तो पुरा मिला है ना? फीर क्यों भाई खाली पिली तकलिफ देते हो? हमें हमारा काम करने दो तूम तुम्हारा काम करो।” असे म्हणून वॉचमन आंबऋषीच्या दंडाला धरून बाहेर काढू लागला.
“ठैरो भाई, अंगको हात मत लगाना। जा रहा हूँ बाहर। धक्का कें मारते हो? गलती मेरी है। मैं दुसरोंके जगहमें घूस गया। मैं भूल गया की मैं इस खेत का मालीक था।”
असे म्हणत आंबऋषीने डोळ्याला रु’ाल लावला व थरथरत्या पायाने एक एक पाऊल हळुहळू टाकत तो त्या जागेच्या हद्दीतून बाहेर आला.
***
-राजेंद्र भोसले
ब/93, ‘आनंदात्री’, राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर-413 004
भ्रमणध्वनी- 9881786466
Email-bhosale.rajendra.b@gmail.com
प्रकाशन दिनांक | शीर्षक |
---|---|
07 - 04 - 2025 | कविता म्हणजे काय? |
06 - 04 - 2025 | कवितेची व्याख्या - कवितेची बाराखडी |
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.