Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



भारत कशाला म्हणतात!

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

व्यवस्थेच्या केंद्रावर
खरंच माणूस सूखी असतो काहो!
की करता करता जीव जातो त्याचा?
खरं सांगा!
बरं, एक तरी समस्या अशी सांगा
की जी सुटली आहे, माणसाची
हजारो लाखो वर्षांचा इतिहास संघर्ष आणि पराक्रम
पण, 'जलं जीवं इती स्थिति' अशी आहे
की पाणी सुद्धा विकत घ्यावे लागते
इतका मोहताज झालाय माणुस
त्यावर 'माघार घेणे' म्हणजे नामणुष्की अशी आमची शिकवण!
कुठे जात आहोत आम्ही?
खरंच, सांगा ना मला!
नाही, तुम्ही नाही सांगणार
कारण तुम्ही कधी विचार केला नसेल
किंवा भ्याड तरी आसाल तुम्ही!
परंतू मी केलाय
शिवाय धीटपूर्वक सांगु इच्छीतो
की हा सगळा खेळ आहे
ज्याचा 'यमा' शीवाय आनखिन कोणताही दुसरा नियम नाही
परंतू यम हाच जर एक नियम असेल
तर मग, भारत कशाला म्हणतात?
'मृत्युची कला' शोधली नव्हं, ह्याने?
'संन्यास'!
तर मग घ्या तो
ज्यांना आत्महत्या करायची असेल त्यांनी..
खासकरूण आत्महत्या करणार्या शेतकर्यांनो, घ्या संन्यास!
इथे कुत्र उपाशी मरत नाही!!
आणि सोडा पाणी, ह्या बेरहम व्यवस्थेवर
कारण ही फक्त तुमच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकते!!!

Share

प्रतिक्रिया