Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : नियम आणि अटी

 
 

 

 

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : वर्ष ४ थे

     कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण,
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक 
युगात्मा शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीदिना निमित्त (३ सप्टेंबर २०१७)  

सादर करीत आहोत.....

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७

लेखनाचा विषय : शेतकरी आत्महत्त्या
 
या स्पर्धेचे दोन प्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०१७, पद्यलेखन स्पर्धा-२०१७
 
१] गद्यलेखन स्पर्धा-२०१७
विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख ड) मागोवा 

२] पद्यलेखन स्पर्धा-२०१७

विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) गझल   ड) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:
१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची निवड केली जाईल.

पारितोषिकाचे स्वरूप :
प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.
निकाल :

युगात्मा शरद जोशी यांच्या महापरिनिर्वान दिनी १२ डिसेंबर २०१७ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

पारितोषिक वितरण :

सन २०१८ मध्ये होणार्‍या ४ थ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :

१) स्पर्धा ०३ सप्टेंबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल.
लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2017 हा धागा वापरावा.
३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास युगात्मा परिवार हे Mobile App वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app6... या लिंकवर क्लिक करा.
४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह  abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती  abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख   ब) चरित्रलेख   क) वृत्तांतलेख  ड) अनुभवकथन/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. 
८) संयोजक मंडळ व परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
९) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
१०) गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
११) गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल. गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.

नियम व शर्ती :

१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती
                                                                                                                          
                आपला स्नेहांकित
                                                                                                                             
                    गंगाधर मुटे                                                                                                          
                संस्थापक अध्यक्ष                                                                             
       अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
*  *  *
अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/  किंवा https://www.facebook.com/groups/abmssc/ 
येथे भेट द्या.
*  *  *
महत्वाची सूचना : मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास युगात्मा परिवार हे Mobile App वापरणे सुलभ ठरू शकते. App डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app6...या लिंकवर क्लिक करा.
*  *  *
 
 
Share

प्रतिक्रिया

  • admin's picture
    admin
    सोम, 04/09/2017 - 12:22. वाजता प्रकाशित केले.

    विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : शंका समाधान

    http://www.baliraja.com/node/1200

  • ravindradalvi's picture
    ravindradalvi
    सोम, 04/09/2017 - 12:52. वाजता प्रकाशित केले.

    चला सुरवाती झालीय आनंद झाला आता वेध संमेलनाचे
    विषयही जगण्यामरण्याचा ठेवलाय, निश्चितच मंथन होईल अधिकाधिक लोकापर्यंत हि चळवळ जाण्यास सहाय्यभूत ठरेल
    असा विश्वासच आहे

    रवींद्र अंबादास दळवी
    नाशिक

    रवींद्र अंबादास दळवी
    नाशिक

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 05/09/2017 - 18:04. वाजता प्रकाशित केले.

    अवश्य लिहावे आपण.
    या स्पर्धेचा उद्देश शेतकरी आत्महत्या या विषयावर सर्वांना लिहिते करणे हाच आहे.
    स्पर्धा हे फक्त निमित्त आहे.

    शेतकरी तितुका एक एक!

  • विनिता's picture
    विनिता
    बुध, 06/09/2017 - 09:21. वाजता प्रकाशित केले.

    सुरुवात झाली Smile

    चला लिहीते होऊयात

  • Dhirajkumar Taksande's picture
    Dhirajkumar Taksande
    शनी, 09/09/2017 - 13:18. वाजता प्रकाशित केले.

    विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2017

    स्पर्धेच्या निमित्ताने का होईना शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येवर शब्दातून अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली, स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच्या या समस्येने आज भीषण स्वरूप धारण केले आहे राष्ट्रसंतानी ग्रामगीतेत म्हटले.....
    कच्चा माल शेतकरी कुटीचे, मातीच्या भावे |
    पक्का होतीची चौपटीने घ्यावे ||
    मग कैसे सुखी व्हावे|
    ग्रामजन पिकओनी उपाशी ||
    समस्या केवळ कर्जाचीच नाही, बियाणे, खते, कीटकनाशके, बाजार, सरकारी संरक्षणाची उदासीनता व काम आणि दाम यात ताळमेळाची कमतरता . त्यामुळे अन्नदात्याला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला हि अत्यंत शरमेची निंदनीय बाब आहे. साहित्यातून त्यांच्या वेदना जगापुढे याव्यात. ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल व्हावा. बळीराजाचे राज्य निर्माण व्हावे यासाठी चालविण्यात येत असलेल्या उपक्रमास शुभेच्छा!
    अंगारमळा असाच जळत रहावा
    उपेक्षितांना प्रकाश मिळत रहावा

  • Anu25488's picture
    Anu25488
    शनी, 30/09/2017 - 21:34. वाजता प्रकाशित केले.

    देश शेतकऱ्यांच्या मुळेच उभि उभा आहे

  • Anu25488's picture
    Anu25488
    शनी, 30/09/2017 - 21:39. वाजता प्रकाशित केले.

    देवा शेतक-या पोटी
    जन्म एकदा तू घेरे
    दुःख डोंगराएवढे
    थोडे सोसूनी पहारे ।।

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 01/10/2017 - 09:16. वाजता प्रकाशित केले.

    प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत : ०२ ऑक्टोंबर २०१७

    विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ मध्ये सहभाग नोंदवणारांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत. तांत्रिक कारणामुळे अनेकांना प्रवेशिका दाखल करणे अजून पावेतो शक्य झालेले नाही, याची आम्हाला नम्र जाणीव आहे.

    संकेतस्थळाचा वापर करणे अनेकांना शक्य न झाल्याने त्यांनी आपल्या रचना ईमेल किंवा व्हाटसप व्दारे पाठवून त्यांना स्पर्धेत सहभागी करून घ्यावे, अशी विनंती केली आहे. पण ईमेल किंवा व्हाटसप व्दारे आलेल्या रचनांचा स्पर्धेत समावेश केला जाऊ शकत नाही, तसे केले तर स्पर्धा आयोजनाच्या मूळ उद्देशालाच तडा जातो, याची सर्वांनी तसेच संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रवेशिका सादर कर्त्याने http://www.baliraja.com/node/add/spardha-2017 या धाग्यावरच आपली रचना सादर केली पाहिजे. बळीराजा डॉट कॉम वर रचना सादर करताना अडचणी येत असल्यास त्या संबंधात संपूर्ण सहकार्य व मदत करण्याची आमची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिलेली आहे आणि यापुढेही कायमच असेल, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी.

    बळीराजा डॉट कॉम वर रचना सादर करण्याची प्रक्रिया किचकट वाटत असली तरी ही प्रकिया तशी मुळीच किचकट नाही. कोणताही विषय अथवा प्रक्रिया आपल्याला माहिती नसल्याने किचकट वाटत असते. एकदा माहित झाली की तीच प्रक्रिया आपल्यासाठी सुलभ होऊन जाते. बदल्या काळात इंटरनेटचा वापर अपरिहार्य झाल्याने व शेतीविषयाला आंतरजालाच्या (इंटरनेट) च्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करण्याची ऐतिहासिक संधी उपलब्ध झाल्याने शेतकरी पुत्रांना इंटरनेटशी जोडून व्यक्त व्हायला मदत करणे, हेही या स्पर्धेचे एक प्रमुख ध्येय आहे.

    वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्रवेशिका सादर करण्याची संबंधितांना विनंती करण्यात येत आहे. तसेच ज्यांनी यापूर्वीच रचना सादर केलेल्या आहेत त्यांना काही संपादन करायचे असल्यास अंतिम मुदतीपूर्वी उरकून घ्यावे. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर संपादन करण्याची सुविधा बंद होत असते, कृपया याचीही सर्वांनी नोंद घ्यावी.

    - गंगाधर मुटे
    ०१/१०/२०१७
    ************
    Fingure-Right स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहितीसाठी >>> http://www.baliraja.com/node/1199

    Fingure-Right सादर झालेल्या प्रवेशिका पाहण्यासाठी >>> http://www.baliraja.com/spardha-2017

    Fingure-Right विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : शंका समाधान >>> http://www.baliraja.com/node/1200

    शेतकरी तितुका एक एक!