Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



व्यवस्थेचा बळी

लेखनविभाग: 
कथा

कथा

व्यवस्थेचा बळी

शालीकराम धोटे हा कोरडवाहू शेतकरी.आता मात्र वयमानानुसार थकला होता. आजारपणात जीवनसंगीनी सोडून गेल्याने त्याचं मन कायच्यातच लागाचं नाई.त्याले तीन लेकरं होते.मोठा शामराव दुसरा मोतीराम व मुलगी मीरा.मीरा लग्न होऊन नांदाले गेली होती.दोन्ही पोरयचे लग्न लावून देलले होते. मोठा पोरगा शामराव व सुनबाई कांता दोघही समझदार होते. लायण्या मोतीरामची बायको अलका थोडी हट्टी होती, पण मोठा मुलगा व सून घर संभाळून नेईन याची शालीकरामले खात्री होती.एक दिवस शालीकरामनं दोन्ही पोरयले बलावलं अनं सांगतलं पोरयहो आतापर्यंत म्या कास्तकारी सांभाळली.येच्यापुढं मले काही काम होणार नाई. मोतीराम,शामराव तुम्ही एकमेकाच्या सल्ल्यानं शेत संभाळा. दोघयनही माना डोलवल्या.दोघही वावरात खूप मेहनत कराचे.वावरही चांगलं पिकत होतं.खर्चपणी जाऊन चार पैसे उरत होते;पण लायण्या मोतीरामच्या बायकोनं कुरापती कराले सुरवात केली.त्यामुळं दोघाभावात मतभेद व्हाले लागले. लायण्यानं हिस्सा मांगतला. शामरावनं वादविवाद न करता त्याले हिस्सा देऊन टाकला.आता दोघं भाऊ वेगवेगळे शेती करत होते.मोतीराम बायकोच्या मताचा असल्यानं त्यानं थोड्याच दिवसात वावर इकलं.शामराव व त्याची बायको मात्र रात्रंदिवस वावरात कष्ट कराचे.वावरातलं उत्पन्न वाढाले लागलं तसं त्यानं वावरात हिर खांदली,हिरीले चांगलं पाणी लागलं.नवीन मोटरपंप बसवला,कोरडवाहू वावर आता ओलताखाली आलं. तेच्यात शामराव व कांता यांना देवकी,नमा व संजय नावाचा मुलगा झाला.त्यांचं कुटूंब खाऊन पिऊन सुखी होतं.शामराव व कांता बैठकीत बसले होते.लेकरं तयारी करून शाळेत गेले. तुले एक सांगू कांता, "सांगाना" "आपल्याले गरीबीमुळं शाळा शिकता आली नाही,पण आता लेकरयले खूप शिकवाचं.आपले लेकरबी हुशार हाये.तेयले काहीच कमी पडू द्याच नाही." "बिलकूल मह्या मनातलं बोलले तुम्ही,मी ही दुप्पट कष्ट करनं तुमच्या साथीनं." कांता बोलली.हिरीले पाण्याचा चांगला आवक होता.जून महिना आला. काये काये ढग अभायात फिराले लागले. पावसायाले सुरवात झाली.जमीनीच्या पोटातून हिरवे हिरवे कोंब डोकावाले लागले होते.एक दिवस सकाई सकाई वावरातून चक्कर मारून आल्यावर,शामरावनं कांताले आंगणातूनच आवाज देलला."कांते ओऽऽ कांते,"कांता लगबगीनं बाहेर आली."काय म्हणता ओ? "थो मह्या दुपट्टा घे बरं" कांता बोलली,"का ओ? मी मनतो कुठं जाचं हाये एवढ्या घईनं?"अवं कांते,"तुले म्हटलं होतं ना या वर्षी संत्राचे झाडं बसवाचे म्हणून वावरात.थो देशमुखाचा गजा चालला त्याच्या बरोबर जाऊन संत्राची पनिरी घेऊन येतो शेघाटहून".कांतान आणलेला दुपट्टा खांदावर टाकून शामराव पनिरी आणाला निघून गेला.मजूर लावून संत्रा लागवड पूर्ण करून घेतली.कापसाची वखरनी,ज्वारीची डवरणी, हे कामं शामराव स्वतः कायजीनं करत होता.कांताबी वावरात निंदन, खुरपण करत होती.पीकपाणी चांगलं होत असल्यानं सारं आनंदात चाललं होतं.शामराव तसा माणुसकीचा माणुस अडीअडचणीत थो दुसरेयले मदत कराचा.कोणीही गोरगरीब अडचण घेऊन दारात आला का चार- दोन पायल्या समोरच्याच्या पदरात टाकाचा,आपल्या भावाच्या संसाराले मदत कराचा, वावरातल्या तुरीच्या शेंगा,चार दोन चन्याचे डाखोये नेणार्‍याले कवाच हटकाचा नाई. कवाकवा बायको त्याले म्हणाची, "कावो आपण दिवस रात्र कष्ट करतो अनं तुम्ही असे वाटत फिरता." शामराव म्हणाचा, "कांते म्या लहानपणा पासून खूप अडचण सोसली हाये. आता आपल्याले देवानं पदरी धरलं, शेर पसा कोणाले देलल्यानं कमी होत नाई". कांतीबी बिचारी काय बोलणार चुपचाप राहाची. संत्राचा बगीचा आता येता झाला होता.पयल्याच वर्षी सपाटून फुटल्यानं शामरावचं स्लॅबचं घर उभं रायलं होतं.शामराव त्याच्या वडीलाची म्हणजे शालीकरामचीही मनोभावे सेवा कराचा.मोठमोठ्या दवाखान्यात त्याले दाखवलं पण अराम पडत नव्हता.डॉक्टरन सांगतलं, "यांना आता घरी घेऊन जा,यांची शेवटची घडी जवळ आली आहे". दुसऱ्याच दिवशी शालीकरामनं जगाचा निरोप घेतला.शामरावनं भावाले संग घेऊन साऱ्या विधी पार पाडल्या.
दरवर्षी बगीचा येत होता, पण शामराव व कांताच्या मेहनतीत कवाच खंड पडला नाई.एक दिवस शामरावचा लहानपणीचा मित्र रविंद्र सोनारे घरी आला.ज्याचा शहरात व्यवसायात चांगला जम बसला होता.त्याले समोर पाहून शामरावाले खूप आनंद झाला.लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या."बरं इकडे कसा काय आलास एवढ्या दिवसानं?" रविंद्र बोलला, "अरे तुही आठवण येत होती,पण वेळच मिळत नव्हता.आता पोरगं धंदा सांभाळते चाला म्हटलं तुही भेट घ्या." "बरं झालं आला.मलेतं राजा ह्या कास्तकारीमुळं वेळच भेटत नाई." शामराव बोलला. कांतानं रविद्रासाठी पाहुणचार केला,आग्रहानं वाढलं, व बोलली,"पोटभर जेवा बापा भवजी.नईतं म्हणान वहिणीनं उपाशीच ठेवलं." "नाई ओ वहिनी मले हे घर परकं थोडीच हाये". रविंद्र बोलला.जेवण झालं तसं रविंद्रनं विचारलं "लेकरं काय करते शामराव?" शामराव उद्गारला,"ही मोठी शांती ईचं बी.ई सुरु आहे,दुसरी नमी बारावीत तर ह्या संज्या नववीत शिकते. "काहीबी मन राजा शामराव खेड्यात राहून त्याबी चांगलाच जम बसवला अनं लेकरयले वयण बी चांगलं लावलं." रविद्र बोलला."सारी थ्या ईश्वराची कृपा". शामरावच्या तोंडून उद्‌गार निघाले.भेटीने दोघांनाही समाधान वाटले. गावाकडे येण्याचं निमंत्रण देऊन रविंद्रने शामरावचा निरोप घेतला.
शामरावनं वावरात गहू टाकला होता. गव्हाले पाणी ओलाचं होतं,अनं दुसरे काही कामं सलटवाचे होते. शामरावनं नमीले आवाज देलला, "नमाऽ ओऽ पोरी" नमा धावतच आली. "काय म्हणता बाबा"? "मह्या थो अवजाराचा थैला आण बरं." नमानं थैला आणून देलला. "अनं मायले मना लवकर शिदोरी घेऊन ये जो." "हो बाबा सांगतो." शामराव रस्त्यान होता. गणपत कराळे आपल्या वावरात वखर वाहत होता.शामरावनं आवाज देलला,"ओऽ गणपतराव,आज सकाई सकाई वावरात.जोर्‍यावर दिसते बा काम." "कायचं राजा शामराव भऊ. तुह्य काम मोठं हाये राजा.तुह्या गहू पार जमीनीच्या वरतं आला.आणं आमची आता कुठं पेरणीची तयारी सुरु हाये. येणं गा अंदरऽऽ का रस्त्यावरूनच बोलशीन.घे पाणी गीनी पे".गणपत बोलला. तंबाखाले चुना लावत, पिकापाण्याच्या गोष्टी करत दोघं जण बसले.वेळ होते म्हणून शामरावनं गणपतचा निरोप घेतला.आता शामराव वावराकडे निघाला.मोटर सुरु केली.पाचची मोटर असल्यानं पाणी दांडानं सुसाट पयत होतं.शामराव सपासप दारे फोडत होता.थोड्या वेळानं त्याची बायको कांती शिदोरी घेऊन आली.तिनं
शामर%E

Share