Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पाणी लाऊन हजामत

पाणी लाऊन हजामत

गुदस्ता पाऊस आलाच नव्हता
कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता
पीक उगवलंच नव्हतं
जे उगवलं ते जगलंच नव्हतं
जे जगलं ते वाढलंच नव्हतं
जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं
निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!

सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो होतो
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!

पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं
मात्र ते मख्ख होतं, ते बोल्लंच नव्हतं
हात काही त्यानं पसरलाच नव्हता....!

औंदा मात्र पाऊस आला
जिकडेतिकडे कहर झाला
डोंगर-दर्‍या हुदडत गेला
छाती फोडून दरवाजा केला
उभं पीक वाहून गेलं
जे वाहवलं नाही ते दबून गेलं
जे दबलं नाही ते कुजून गेलं
जे कुजलं नाही ते सडून गेलं
जे सडलं नाही ते मरून गेलं
निसर्गानंच केली! हजामत केली!! पाणी लाऊन केली!!!

सरकार आलं, मुठभर घेऊन आलं,
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं,
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो,
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!

पण एक येडं होतं, सर्वांच्या मागं होतं
हात काही त्यानं पसरलाच नाही....!
मात्र ते मख्ख नव्हतं, आता ते बडबडत होतं
स्वत:शीच पुटपुटत होतं

"च्यामारी! आयला!! च्यामायला!!
जवा-जवा पिकलं, भरमसाठ पिकलं
तवा-तवा ह्यांनी, सस्त्यामधी लुटलं
रुपयाचा शेतमाल चार आण्यात नेला
म्हून माहा धंदा घाट्यामंधी गेला
ह्यांच्यापायी लक्षुमीवर अवदसा आली
गावासंग ग्रामदेवता पुरी भकास झाली"

"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं
कणभर मदतीची भीक मागत सुटणं"

"अरे छी! अरे थू!! असल्या जिंदगीवर
भिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर"

येडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो
मात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो

                                             - गंगाधर मुटे ’अभय’
---------------------------------------------------------

Share

प्रतिक्रिया