Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शेतकरी साहित्य संमेलनाने शेतकरी साहित्यिक घडवले : 12sss

शेतकरी साहित्य संमेलनाने शेतकरी साहित्यिक घडवले

दिनांक 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन हे शरद कृषी महाविद्यालय व यड्रावकर शिक्षण व उद्योग समूहामार्फत मा.आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यड्रावकर नाट्यगृहात घेतले. दोन दिवसांचे हे संमेलन आमदार साहेबांच्या आदरातिथ्यातील स्वादिष्ट भोजन, साहित्यिकांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था व नेण्याआणण्याची स्वतंत्र बस आणि शेतकरी साहित्याची रेलचेल यामुळे अतिशय बहारदार झाले.
या संमेलनात शेतकरी संघटनेच्या नामवंत पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून शेतकरी हिताच्या अनेक गोष्टीबाबत मार्गदर्शन केले. श्री. गंगाधरजी मुटे यांच्या संकल्पनेतून शेतकरी नेते शरद जोशी यांच्या हस्ते त्यांनी पहिले संमेलन भरवले. या पहिल्याच संमेलनात प्रेमकाव्याच्या गझलेला फाटा देवून शेतकरी गझलेचा जन्म झाला. तीच परंपरा आजही कायम चालू आहे. आज शेतकऱ्याविषयी वाढलेले लिखाणासाठी साहित्यिक घडवण्याचा मोठा वाटा हा अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा आहे. आजच्या या 12 व्या तपपूर्तीचे संमेलनात शेतकरी हिताचे 3 परिसंवाद, एक निमंत्रितांचे कविसंमेलन व एक शेतकरी गझल मुशायरा व मुंबई येथील अक्षांशस्वर दिव्यदृष्टी कलाकारांचा "शेतकरी भक्ती प्रभात" हा सुंदर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी विश्वस्तरीय लेखनस्पर्धेतील 14 लेखन प्रकारातील 31 विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात मला शेतकरी नमनगीत आणि मराठी भाषा गौरवगीत म्हणण्यास संधी मिळाली. कविसंमेलनाचे अध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे यांचा सन्मान करण्याचा योग आला. निमंत्रित कवींचे कविसंमेलनात कविता सादर करण्याचा बहुमान मिळाला. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे स्पर्धेचे संयोजक होण्याचा सन्मान मिळाला. स्पर्धा संयोजक या नात्याने पारितोषिक वितरण समारोह व समारोप समारंभात प्रमुख मान्यवर यांचेसोबत व्यासपीठावर उपस्थित राहाता आले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या "शेतकऱ्यांचे भाव एक स्वप्न" या कवितेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तो सन्मान घेण्याचा बहुमान मिळाला.
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य परिषदेने या संमेलनात मला इतके सन्मान दिले त्याबद्दल मी आयोजक श्री. गंगाधरजी मुटे, मुंबई हायकोर्टाचे वकील ॲड. श्री. सतीशजी बोरुळकर व टीम यांचा कायम ऋणी आहे.

- राजेंद्र फंड
राहाता, अहिल्यानगर

Share