
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्वतंत्र भारत पक्षाचे राज्य अध्यक्ष अँड दिनेश शर्मा ,गुणवंत पाटील, सरचिटणीस गंगाधर मुटे ,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट ,स्वतंत्र भारत पक्षाच्या युवा आघाडीचे सुधीर बिंदु ,शेतकरी महिला आघाडीच्या गीता खांदेभराड ,युवा आघाडीचे सतीश दाणी ,राम नेवले, ललीत बहाळे यांच्या सह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते .या बैठकीचे प्रास्ताविक अध्यक्ष अँड दिनेश शर्मा यांनी केले या वेळी गेल्या चार निवडणुकांमध्ये स्व.भा.प.च्या वतीने लढण्यात आलेल्या जागांचा आढावा सुधीर बिंदु यांनी दिला तर गुणवंत पाटील यांनी पक्षाच्या मान्यते बाबत चालु असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली .केंद्रीय निवडणुक आयोगाकडे पक्ष नोंदणीकृत असुन त्या नोंदणीवर स्वतंत्र भारत पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुक लढता येणार असल्याचे सांगितले.या वेळी जिल्हावार आढावा घेऊन लढवण्या योग्य जागांची निश्चिती करण्यात आली.या वेळी स्वतंत्र भारत पक्षाच्या झेंड्यावर चर्चा करुन झेंड्यास मान्यता देण्यात आली .या वेळी माजी आमदार सौ सरोज काशीकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी स्वतंत्र भारत पक्षाने कृषी धोरणावर निवडणुक लढवावी अशी अपेक्षा पक्षाकडे व्यक्त केली .या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा .मानवेंद्र काचोळे यांनी व्हीडीओ काँन्फ्रसिंगवरुन उपस्थितांशी संवाद साधला .या बैठकीचा समारोप माजी आमदार वामनराव चटप यांच्या जोशपुर्ण भाषणाने करण्यात आला.या भाषणात चटप यांनी शरद जोशी यांच्या स्वप्नातील स्वतंत्र भारत पक्ष उभा करण्यासाठी पक्षाने दोन खासदार ,दहा आमदार व सहा टक्के मता साठी प्रयत्न करावेत असे आवहान करुन स्वतंत्र भारत पक्षाची सदस्य नोंदणी ग्रामीण भागासह शहरी भागातुन करण्याचे आवाहान केले. या बैठकीसाठी राज्यभरातुन स्वतंत्र भारत पक्षाचे नेते व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.