ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे.
पण; आता शेतकर्यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ७ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे सातवे वर्ष.
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०२० ते ०२ ऑक्टोबर २०२० या कालावधीत बळीराजा डॉट कॉम (
www.baliraja.com ) या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेती आणि कोरोना" असा जटिल असल्याने या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : श्री सिद्धार्थ भगत (यवतमाळ), प्रा. चित्रा कहाते (नागपूर), जनार्दन म्हात्रे (ठाणे), प्रा. मनीषा रिठे, श्री प्रफुल्लजी व्यास, श्री दत्ता राऊत (वर्धा), सौ. गीता खांडेभराड (जालना), ऍड प्रदीप पाटील (मुंबई), श्री वासुदेव सुभेदार (बुलडाणा), श्री योगेश गिरडकर (नागपूर)
प्रतिक्रिया
sahasik wrutt
शेतकरी तितुका एक एक!
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
अभिनंदन
सर्व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन.....
आयोजक, परीक्षक यांचे
मनापासून आभार
Mahi
पाने