Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



मोती असे गळाले..

लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
लेखनविभाग: 
पद्यकविता

जेव्हा जेव्हा झाली अवकृपा तोंडचे पाणी पळाले
सवय झाली जिंदगीला कित्येक मोती असे गळाले ||धृ||

व्यवस्था तर भलतीच चालली आहे माजत
धर्म असुन नाही कुणी कुणास पाणी पाजत
लुटारुही आम्हा नाही लुटण्यासाठी लाजत
ढिले झाले तार आता विणाही नाही वाजत
कितीतरी ओले जीव असेच विनाकारण जळाले||१||

झुंजलो वादळाशी प्राणज्योत नाही विझत
पाऊस पडतोय असा की अंग नाही भिजत
थकलेत सारे शरीर तरी डोळे नाही निजत
आपलीच डाळ आपल्या घरी नाही शिजत
भांडवलशाहीच्या जात्यात मजूर लागलेत दळाले||२||

लागवडीचा खर्चही आता नाही शेती काढत
डोंगर कर्जाचा दिवसेंदिवस चालला वाढत
मरणघडी येईस्तोवर राहायचे असेच नाडत
शासनयंत्रणा जित्यापनीच आहे आम्हा गाडत
या गंभीर विकाराला सरकारने वरपांगी पडताळले||३||

शोधतो प्रीतीची किरणं कुठे पाझरततात
अश्रूंच्या थेंबातून कशी काव्य उमलतात
वाट बघतोय कोण आम्हाला हृदय देतात
नव्यानेच श्वासांची नवी भेट घेऊन येतात
मृत्यू कुणा आवडतो जर जीवनाचे दान मिळाले||४||

Share

प्रतिक्रिया