Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



वृद्धांना आधार हवा!

वृद्धांना आधार हवा!

दि. २५/९/२०११ च्या मंथन पुरवणीतील “अडगळही, देवघरही…” हा गजानन जानभोर यांचा आणि “वृद्ध नव्हे, ज्येष्ठ!” हा नीलिमा बोरवणकर यांचा लेख वाचला. खेडे आणि शहरातील वृद्धांच्या सद्यस्थितीचे दोघांनीही अत्यंत मार्मिकपणे वर्णन केले आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करून, स्वतःच्या इच्छा मारून, आपल्या पोटाला चिमटा काढून, प्रसंगी उपशीही राहून आपल्या अपत्यांचे पालनपोषण करणार्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी मात्र त्यांची मुले त्यांची साथ सोडतात. यावेळी जेव्हा त्यांना आपया इच्छा पूर्ण करण्याची इच्छा होते तेव्हा त्यांची मुले आपली जबाबदारी झटकून टाकतात. नाइलाजाने त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. काही जणांची अशी समजूत आहे की त्यांना गरजेपुरते पैसे दिले की आपले काम संपले! त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टांचे यांच्या नजरेत काहीही मोल नसते. काही तर असेही म्हणतात की ते त्यांचे कर्तव्यच होते.

या समस्येवर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे पाल्यांना त्यांची जबाबदारी कळली पाहिजे. त्यांच्यामध्ये जागृती होणे आवश्यक आहे. कायद्याने वृद्धांचा सांभाळ करणे बंधनकारक केले असले तरी त्याचे पालन होताना दिसत नाही. केवळ कायदे बनवून चालणार नाही तर त्याची कडक अंमलबजावणीही झाली पाहिजे. कठोर शिक्षेचीही निकड आहे. ज्येष्ठ नागरिक मंडळासारख्या संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. एकंदर पाहता समाजजागृती हाच या समस्येवर रामबाण इलाज आहे.

लेखक:- विश्वजीत दीपक गुडधे

वर्ग:- १० वा

मणिबाई गुजराती हायस्कूल, अमरावती.

फोन:-२५५००१६, ९४०३८४०१०९.

Share