Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



बाहुलीच्या खेळासारखा लॉकडाऊन नकोच ||कोरोना माहात्म्य - १५||

कोरोना माहात्म्य ||१५||
बाहुलीच्या खेळासारखा लॉकडाऊन नकोच
 
वाढता कोरोनाचा विळखा लक्षात घेता आता बाहुलीच्या खेळासारखा लॉकडाऊन परिणामकारक ठरण्याची शक्यता नाही. त्यातही विरोधी पक्षनेत्याने "लॉकडाऊन नको" अशी बालिश विधाने केल्याने बाहुलीच्या खेळासारखा लॉकडाऊन सुद्धा जाहीर करायला विलंब झाला.
आता जनतेला आपापल्या घरीच थांबा यासारखे प्रेमाचे आवाहन करून काही साध्य होईल असे वाटत नाही. १५ दिवसाचा कडक लॉकडाऊन हवा. न ऐकणाऱ्याच्या पार्श्वभागावर फटके हाच त्यावर सर्वोत्तम मार्ग आहे. या फटक्यांचा निषेध करायला कुणी मानवाधिकारवाला आला तर त्यालाही फटके... 
कोरोना उद्रेकाच्या काळातही निवडणूक सभा घेऊन कोरोनाचा सढळ हाताने घाऊक प्रमाणात प्रसार करणाऱ्या राजकारणापायी पिसाळलेल्या नेत्यांना फटके हाणण्याची कुवत आम जनतेने दाखवायला हवी होती पण आम जनताही राजकारणापायी पिसाळली असल्याने त्यांना तसे धाडस दाखवता आले नाही याउलट आपापल्या पक्षाच्या नेत्याचे समर्थन करण्याचेच पातक जनतेने केले...... त्यामुळे..... आता फटके खाण्याची पाळी जनतेचीच आहे. 
 असे काही करण्याची सुबुद्धी याक्षणी सुचली तरच काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. नाही तर "स्मशान दूर नही है"
"ते रमजान साजरा करताहेत म्हणून हे कुंभमेळ्याचे समर्थन करत आहेत.... आणि.... हे कुंभमेळ्याचे समर्थन करत आहेत म्हणून ते रमजानचे समर्थन करत आहेत"  असे आज चित्र उभे राहिले आहे देशभर.. 
लोक राजकारणापायी पिसाळले आहेत म्हणून कोरोनाचा विळखा वाढत आहे. 
जात्यंध, धर्मांध, पक्षांध व राजकारणांधतेपायी गमावलेले तारतम्य पुन्हा प्राप्त होईल असे काहीतरी करायला तयार व्हा... किंवा.... आपापल्या आप्तेष्ठांना कोरोनापायी गमवायला तयार व्हा. जीव आणि जिव्हाळा तुमचा..... त्यामुळे निर्णयही तुमचाच!
 
- गंगाधर मुटे आर्वीकर 
(क्रमशः)
=============
या लेखमालेतील इतर लेख
http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.
==============

Share