Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



दुसऱ्या शेतकरी - स्त्री कवी संमेलनाचा वृतांत

दुसऱ्या शेतकरी - स्त्री कवी संमेलनाचा वृतांत

कोरोना अरिष्टामुळे सध्या झूम मीटिंग व फेसबुक लाइव्ह अशा माध्यमातून सुरू असलेल्या सातव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आज मंगळवार, २३ मार्च २०२१ रोजी चौथे पुष्प "शेतकरी - स्त्री कवी संमेलन" या रूपाने गुंफण्यात आले. सदर कवी संमेलनाला अध्यक्ष म्हणून चंद्रपूरचे मा. प्रदीप देशमुख तर सुत्रसंचालिका म्हणून वर्धेच्या मा. जयश्री कोटगीरवार या लाभल्या होत्या..

नाशिकचे रवींद्र दळवी यांच्या "कालचा बापू आज ऐकत नाही बापाचं, रोज सांगते मले कास्तकार नाही बनायचं." या कवितेने सुरू झालेल्या सदर कवी संमेलनात अध्यक्षांसह ऐकून सोळा कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून अक्षरशः श्रोत्यांची मने जिंकली. नरेंद्र गंधारे (हिंगणघाट) यांनी, "जराशे हितगुज तुमच्याशी" ही कविता सादर करून स्त्री विश्व मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर संजय कावरे (मंगरूळपीर) यांनी "माया कायजाची राणी, काहून डोया आलं पाणी", सचिन शिंदे (यवतमाळ) यांनी, "पातीवरल्या बाया तुडवतात रानवाट दुःखाची", निलेश तुर्के (यवतमाळ) यांनी "परतीच्या पावसानं सारं गेलं वाया", अनुपमा जाधव (पालघर) यांनी "रानातलं पीक बघून शेतकरी सुखावला", संगीता घुगे (नांदेड) यांनी, "घन ओथंबून आले". दिलीप भोयर (अमरावती) यांनी "पुढारी कसे झाले हे येडपट, भाव देऊ म्हणे दिडपट", या स्वरूपाच्या अतिशय अशा प्रभावी कविता सादर केल्या. त्यानंतर आलेले रत्नाकर वानखेडे (अमरावती) यांचा ऑडिओ काहीसा क्लिअर ऐकता आला नाही परंतू त्यांनी देखील खूप सुंदर कविता सादर केली. प्रज्योत देशमुख (अकोला) यांची "खरीपात केला लाल, आता रब्बीवर डोया" ही कविता खरंच भाव खाऊन गेली. त्यानंतर आलेले राजेश अंगाईतकर (यवतमाळ) यांनी "कसाई नेतो आहे आमचे बांधून चारही पाय, सांगा मालक आम्ही असं चुकलो तरी काय" ही अतिशय भावुक करून टाकणारी कविता सादर केली. नारायण निखाते (तळेगाव) यांनी "पाणी अडवा पाणी जिरवा", सूत्रसंचालिका जयश्री कोटगीरवार यांनी "मी नव्या जगाची कैवारी", कार्याध्यक्ष गंगाधर मुटे सरांनी, "सच्चे दिन म्हणता म्हणता लुच्चे दिन आले, शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले" ही कविता सादर केली.

सदर कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी शेवटी दिलेल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व सहभागी कवींना अधोरेखित करून त्यांनी सादर केलेल्या रचनांचा सुरेख मागोवा घेतला. तसेच, "होती गोटाळ्याची तरी वाट पांदनीची" व "हजार बंध तोडूनी लखाख दामीनीपरी" या आपल्या बहारदार अशा रचना सादर केल्या व आजच्या या कवी संमेलनाच्या समारोप झाला.

- डॉ. रविपाल भारशंकर
(अंगारमळा मार्च २०२१ मधे प्रकाशित)

Share