Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



एकदासं तू मरणं देगा...

लेखनविभाग: 
गेय रचना/गीत/पोवाडा इत्यादी
लेखनाचा विषय: 
शेतकऱ्याचा राजा बळीराजा
एकदासं तू मरणं देगा
( राग - पुरिया धनश्री )
 
एकदासं तू मरणं देगा
रोज उली उली मरतो देवा...
थकलो बाप्पा या जगण्याले
जन्म शेतकरी नोको रे बावा...//धृ//
 
शेतकऱ्यांचं जगणं अवघड
मरणं झाल सोप्पं...
शासन उठलं जीवावरती
तू बी करतो घात...
     फासावरती लटकून मेले
     हिशेब त्यायचा ठेवा...
     जन्म शेतकरी नोको रे बावा //१//
 
कपट पणानं बळी घेतला
राजाच्या माह्या...
युग-युग सरले, नाई सरली
कपटी वामनाची साया...
     कोणीतरी गा आमच्या मांगची
     ईडा पिडा नेवा 
     वंश बळीचा नकोस देवा
     करतो रे धावा // २ //
 
कर्जा पाई कवासं नाई
सातबारा sss कोरा...
डोऱ्या मदल्या थांबत नाई
कवास वायत्या धारा...
     तुवा बी पाणी कवा बी येते
     वावर कसा पिकावा...
     जन्म शेतकरी नोको रे बावा //३ //
 
शराप का वरदान आमाले
बळीराजाचं नाव...
भरता काई भरतसं नाई
वैतागाचे घाव...
    दोन बांबु चौदा कांबीनं
    राखड होते देवा...
    गरीब राहो शिरीमंत दोनी
    जाते आल्या गावा //४//
 
सुनिल बावणे - निल
 बल्लारपुर, चंद्रपूर
Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 16/11/2023 - 14:49. वाजता प्रकाशित केले.

    प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

    CongratsCongrats

     

    शेतकरी तितुका एक एक!

  • समीक्षक's picture
    समीक्षक
    सोम, 20/11/2023 - 10:37. वाजता प्रकाशित केले.

    लेखन छान आहे.

  • RANGNATH TALWATKAR's picture
    RANGNATH TALWATKAR
    रवी, 26/11/2023 - 11:47. वाजता प्रकाशित केले.

    रचना छान आहे सर आपण शेतकऱ्यांचं दुखणं रेखाटलय त्याच सोबत जर शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ओळी असत्या तर आणखीनच भर पडला असता,
    माझ्यामते हा विषय निवडण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे पूर्वी असलेले शेतकऱ्यांचे जीवन बळीला कपटाने मारणे आणि आजही सरकार तेच करत आहे तेव्हा कैवारी तरी होते आज मात्र परिस्थिती उलट आहे कारण शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात जागरूक नाही म्हणून आपले लेखन हे शेतकऱ्यांना जागरूक करणारे असावे असे मला वाटते,साहित्य भूतकाळाची दखल घेत वर्तमान मांडून भविष्याचे स्वप्ने साकार करणारी असावी