Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.

none




राजकारणाचा बळी शेतकरी

राजकारणाचा बळी शेतकरी

कंपनीच्या खत बियाण्याची
कंपनी ठरवते किंमत
आमच्या मालाचा भाव ठरते
तीन टिकल्या जंमत

पिकलं शेत चांगल
अहो भाव कोण देते
पडून रायते माल
अन् रेला होते

कंपनेयले असते
सरकारचं पाठबळ
नाही शेतकऱ्यामागं कोणी
नुसतीच होरपळ

दुष्काळात भांडवल
जाते सारं मातीत
तुटपुंज्या मदतीची
सरकार हवा करते रातीत

शेतीचं उत्पन्न दुप्पट
करू सातबारा कोरा
आश्वासनाचा असते
निवडणूकीपुरता मारा

सत्तेच्या सिंहासनावर बसताच
कोणाले आठवत नाही वचन
शेतकऱ्यांचा बळी जातो
यांचे शाबूत वतन

आंदोलन केले की
मिळते गुलामासम वागणूक
खोटे शेतकरी म्हणून
होते सुरु छळवणूक

जीवंतपणी किंमत नाही
मेल्यावर येते मदत
आत्महत्येचं राजकारण
केल्या जाते सतत

कोणत्याच सरकारकडून
नाही मिळाला शेतकर्‍याला न्याय
पेटून उठू, किती पिढ्या
सोसायचा आणखी अन्याय

कवी
लक्ष्मण लाड
मु.पो बेनोडा ता.वरूड
जि. अमरावती
मो.९८५०५६९१३२
Email-laxmanlad76@gmail.com

लेखनविभाग: 
पद्यकविता