![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली
माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली
तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे
जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली
ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला
औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?
घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर झाली
घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली
- गंगाधर मुटे
--------------------------------------
प्रतिक्रिया
ही गझल मला आवडली. मी तुम्हाला
ही गझल मला आवडली.
मी तुम्हाला विचारले होते की गझल ही वृतातच लिहिली पाहिजे का ?
गजानन मुळे
होय. गझल हा फार पुर्वापार
होय. गझल हा फार पुर्वापार चालत आलेला तंत्रशुद्ध काव्यप्रकार असल्याने गझल ही पूर्णपणे गझलतंत्र पाळूनच लिहावे लागते.
शेतकरी तितुका एक एक!
पण प्रयत्नाने गझलतंत्र शिकून
पण प्रयत्नाने गझलतंत्र शिकून आत्मसात करणे मुळीच अवघड नाही.
शेतकरी तितुका एक एक!
गझल
घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली...
वा गंगाधरजी खुपच प्रासादिक आणि मार्मिकही .. आवडली.
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
धन्यवाद नवनाथजी.
धन्यवाद नवनाथजी.
शेतकरी तितुका एक एक!
पाने