पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
सोकावलेल्या अंधाराला इशारा
सोकावलेल्या अंधाराला, इशारा आज कळला पाहिजे वादळ येऊ दे कितीही पण, हा दीप आज जळला पाहिजे
आंब्याला मानायचे कांदा, किती काळ असेच चालायचे? डोळे उघडून तू वाग जरा, नकोसा वाद टळला पाहिजे
गाय इकडे आणि कास तिकडे, चारा मी घालायचा कुठवर? कधीतरी इकडे; या बाजूस, दुधाचा थेंब वळला पाहिजे
प्रवेशदाराचा ताबा घेत, का उभा ठाकला आहेस तू? माझा प्रवेश नाकारणारा, इरादा तुझा ढळला पाहिजे
आता थोडे बोलू दे मला, ऐकणे तुही शिकायला हवे हे आवश्यक नाही की तूच, दरवेळेस बरळला पाहिजे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.