पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
कविता
मनसुबे मुंगळ्यांची
मनसुबे मुंगळ्यांची, ऐरावत बांधण्याची काजवेच बाप झाली, सूर्य चांदण्याची…….!
रक्ताळला तसाची, घाम जिरून गेला, स्वप्नेच वांझ झाली, प्रारब्ध गोंदण्याची…!
डुलतात रानवल्ली, त्यांना फाम असे का ? मक्ते कुणा मिळाली, मुळे खोदण्याची….. ?
बिलग पाडसारे, तू तुझ्या कळपाला, चुल्हे निखार व्याली, तुला रांधण्याची…!
त्यागुनी रणांगणाला, अभय जे पळाली, गर्दी त्यांचीच झाली, शौर्य नोंदण्याची…..!
गंगाधर मुटे ----------------------------------------
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.