पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
नागपुरी तडका
किती चाटणार भारतपुत्रा?
कृष्णावाणी राहुल आणि, म्हणे सोनिया भारतमाय किती चाटणे आणखी रे, भारतपुत्रा असेच पाय? …!!
जन्म गेला पूर्वजांचा, करता करता खुशामतगिरी गुलाम तेही मिरवत होते, चप्पल घेऊन डोक्यावरी दास्यत्वाची जनुकं अजुनी, काही केल्या मरत नाही आनुवंशिकतेची देण अशी की, लाळघोटणे सरत नाही चापलुशीम्होरं आता, कसले संस्कार, कसलं काय …!!
राजेशाहीची भलावण, रक्तामासात भिनलेली भाटगिरीच करता करता, बुद्धी सारी झिंगलेली कणा आणि मणकाही, उत्क्रांतीमध्ये गळून गेला स्वाभिमान नावाचा इसम, शरमेसंगे पळून गेला लोकशाहीचे गुणधर्म रक्तात काही मिसळत नाय …!!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.