Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शरद जोशी भारतात परत आले नसते तर ???

लेखनप्रकार: 
शेतकरी साहित्य चळवळ
लेखनविभाग: 
चळवळीतील अनुभव

शरद जोशी भारतात परत आले नसते तर. आज आम्ही कुठे असतो. आज जे शेतकरी जिव देण्याचे प्रमाण आहे ते (शरद जोशी नसते तर) कित्येक पटिने वाढले आसते. मी पण एका अतमहत्या केलेल्या शेतकऱ्यांचा मुलगा आहे जर शरद जोशीची भेट झाली नसती तर कदाचित मीही या जगाचा निरोप घेतला असता. पण माझ्या आयुष्यात शरद जोशी आले आणि माझ्या जिवणाचे सोने झाले.
राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी हे आंदोलन जगात सर्वप्रथम भारतात शरद जोशीनी सुरू केले. गावाबंदी हे शब्द सुद्धा कोणाला माहित नव्हते. शरद जोशीनी नवनवीन शब्द प्रयोगचा वापर केला.
१९८० साली शरद जोशींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकरी संघटित झाला होता. पुढे सुमारे पंधरा-वीस वर्षांत शरद जोशींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व देशपातळीवरही शेतकरी चळवळीने विविध वळणं घेतली. कोणत्याही चळवळीत अनुभवाला येणारे चढ-उतार पाहिले. काही वेळा अपयशाचंही धनी व्हावं लागलं, पण ‘शेतीमालाला रास्त भाव’ हा विषय राष्ट्रीय कार्यक्रम देशाच्या विषय पत्रिकेवर आणण्याचं श्रेय शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना या चळवळीला अपरिहार्यपणे जातं.
१९७६ मध्ये शरद जोशी परदेशातलीमोठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून ते भारतात परतले. पुण्याजवळ आंबेठाण इथे कोरडवाहु शेती खरेदी करून शेतीतल्या अर्थशास्त्राचे प्रयोग सुरू झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या साधनसामग्रीचा वापर करूनही शेती तोटय़ातच राहते, कारण शेतीमालाला उत्पादनावर आधारित रास्त दर देण्याची व्यवस्था इथे नाही, या भूमिकेला त्या प्रयोगांमधून पुष्टी मिळाली. मग हे तत्त्वज्ञान आजुबाजुचया सामान्य, अडाणी, शेतकऱ्यांना समजावून सांगण्याची धडपड सुरू झाली. त्यातून शेतकरी संघटित होत गेला आणि एक दिवस पुणे-नाशिक रस्त्यावर चाकणच्या शेतकऱ्यांनी बैठक मारून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. या नविन अराजकीय शेतकरी आंदोलनाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यापाठोपाठ झालेल्या नाशिक जिल्हय़ातल्या ऊस आंदोलनाने या चळवळीच्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट झाली होती.
शरद जोशी यांनी आंदोलनास आíथक हत्यारांची जोड दिली. शेतकऱ्याने माल पिकवला, पण बाजारात आणलाच नाही तर काय होते हे खासकरून ग्राहक असलेल्या वर्गास त्या वेळी समजले. सुरुवात झाली कांद्यासारख्या दुर्लक्षित पिकाने. नंतर त्यांनी उसास हात घातला आणि मग कापूस. या तीनही पिकांत महाराष्ट्र आघाडीवर आहे. ही सर्व आंदोलने अत्यंत नावीन्यपूर्ण होती. विठोबाला साकडे, ठिय्या, पान फूल आंदोलन रस्ता रोको रेल्वे रोको आदी अनेक नवनवे प्रयोग शरद जोशी यांनी केले. आंदोलनाच्या स्वरूपावरून त्याची बुद्धी किती ताकदीची होती हे दिसून येते.जिंदाबाद मुर्दाबादच्या निर्बुद्ध घोषणा आणि दगडफेक अशा आंदोलनांना अक्कल लागत नाही. पण शरद जोशी यांनी केलेली सर्व आंदोलने अत्यंत चमकदार होती. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्तीचे आंदोलन छेडले. ‘‘शेतीमालाला योग्य तो बाजारभाव मिळू द्यायचा नाही आणि शेतकरी कर्जबाजारीच राहील अशीच व्यवस्था करायची हेच सरकारचे धोरण असते, शेतकऱ्यांची सर्वच कर्जे अनतिक आणि बेकायदेशीर ठरतात, त्यामुळे ती रद्दच व्हायला हवीत,’’ असा त्यांचा युक्तिवाद होता. शरद जोशीनी तो पटवून दिला होता.
शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे जे नेतृत्व केले, याला अनेक अर्थानी ऐतिहासिक महत्त्व आहे. ते महत्त्व या अर्थाने की, शेतकरी, कष्टकरी हा बहुजन समाजातला. अशा बहुजन समाजातील शेतकऱ्यांचे नेतृत्व तेही एका ब्राह्मणाकडे होते हे भारतात प्रथमच असे घडले आहे.
शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावणं अभिमानची गोष्ट वाटू लागली . एक आवाज दिला की हजारो शेतकऱ्यांनी एकत्र यावं हे महाराष्ट्रात प्रथमच घडत होते . चक्काजाम किंवा रास्ता रोको आंदोलनाचे दोन नवे शब्द महाराष्ट्रात नवीन रुढ झाले. संघटनेने चक्काजामचा इशारा दिला की काही तासात रस्त्याच्या कडेची हजारो झाडे रस्त्यावर येऊन पडायची. वाहतूक ठप्प व्हायची. बंद म्हणजे बंदच. असे अनेक आंदोलने मी अनुभवले.
पण अपयश आपल्या वाटयाला येणार हे माहिती असून देखील शरद जोशीनी तन,मन वा धान या तिन्ही गोष्टी एकत्र करून शेतकऱ्यांच्या साठी कार्य केले. शेतकरी संघटनेचा झेंडा उंचावणारे हजारो कार्यकर्ते हा संघटनेची संपत्ती आहे. शरद जोशींनी घर विकले, मालमत्ता विकली अर्थशास्त्राच्या दृष्टीने त्यांचा ताळेबंद तुटीचाच आहे शेतकऱ्यांसारखा ! मात्र शेकडो शेतकऱ्यांचे प्रेम, आदर, सन्मान जो त्यांनी कमावला, तो भारतात तरी कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाला मिळाला नाही
जर शरद जोशी भारतात परत आले नसते तर हे सर्व शेतकऱ्यांसाठीचे आंदोलने कोणी केले असते शेतीच्या लुटीचे अर्थशास्त्र कोणी समजाऊन सांगितले आसते. ??

Share

प्रतिक्रिया